युरोपीय कंपन्याचे भारतात आगमन
भारत व युरोपीय राष्ट्रे यांच्यातील व्यापार, प्राचीन काली बहुतेक जमिनीवरून व काही प्रमाणात समुद्रमार्गे किनाऱ्यालागत चालत असे. भारतातून युरोपात जाण्याचे व्यापाराचे हमरस्ते ठरलेले होते. या रस्त्यांचे महत्व लक्षात घेऊन व्यापाराची ने आण ताब्यात ठेवण्यासाठी तत्कालीन राष्ट्रात स्पर्धा होती. व्यापार मोठा फायदेशीर ठरत असल्याने ग्रीक, रोमन , हिब्रू या लोकांनी भारताबरोबर होणाऱ्या व्यापारातून अगणित संपत्ती मिळवली