व्यापाराच्या हेतुने पोर्तृगीज व डच यांच्या नंतर इंग्रज भारतात आले. त्यांनी ईस्ट इंंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार मोगल सम्राट जहांगिराच्या कारकिर्दीतचत सुरत येथे स्थापन झाली. १६४० मध्ये इंग्रजांनी मद्रासला जागा घेऊन सेंट जॉर्ज किल्ला बांधला सुभेदार शाहशुजा याने इंग्रजांना परवानगी दिली. त्याचवर्षी राजवंशातील एका स्त्रीवर डॉ. ब्राऊटन याने केलेल्या उपचारांमुळे खूष होऊन शाहशूजाने इंग्रजांना फक्त ३००० रु दर वर्षी देण्याच्या मोबदल्यात संपूर्ण बंगाल पटणा, इ. ठिकाणी वखारी स्थापन केल्या.
महत्वाचे व्यापारी केंद्र गोविंदपूर (आजचे कोलकज्ञ्ल्त्;ाा) येथेही सतरावे शतकाच्या अखेरीस इंग्रज वखार स्थापन झाली. अशा रीतीने व्यापाराच्या निमिज्ञ्ल्त्;ााने इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी बंगालमध्ये आपले हातपाय पसरू लागली. सोळाव्या शतकाच्या सुरूवातीस पोर्तुगिजांनी भारताच्या पश्चिम किनार्यावर आपली सज्ञ्ल्त्;ाा स्थिर केली. त्यानंतर सतराव्या शतकात डच, इंग्रज व फ्रेंच व्यापारी भारतात आले. त्यावेळी भारतात मुघलांची प्रबळ सज्ञ्ल्त्;ाा अस्तित्वात होती. त्यामुळे सुरूवातीच्या काळात युरोपीय व्यापार्यांनी आपले लक्ष व्यापारावरच केंदि्रत केले.
युरोपीय व्यापार्यांच्या प्रारंभिक हालचाली :
सुरूवातीस युरोपीय व्यापारी मुघल सम्राटाकडून परवाने मिळवून शांततेने व्यापार करत असत. व्यापाराच्या सोईसाठी पोर्तुगीज, डच, इंग्रज व फ्रेंच व्यापारी कंपन्यांनी भारतात वखारी स्थापन केल्या. पोर्तुगिजांच्या वखारी गोवा, दीव व दमण येथे होत्या, तर सुरत, खंभात, पटना, मच्छलीपण येथे डचांच्या वखारी होत्या. चेन्नई (मद्रास), सुरत, हुगळी, पटना, कोलकता (कलकज्ञ्ल्त्;ाा), मुंबई इत्यादी ठिकाणी इंग्रजांच्या वखारी होत्या. औरंगजेब बादशहाच्या मृत्युनंतर मुघल सत्तेला उतरती कळा लागली. मुघल साम्राज्याचे सुभेदार स्वतंत्रपणे वागू लागले. देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. याचा फायदा युरोपीय व्यापार्यांनी घेतला.
इंग्रजांचा संघर्ष :
सतराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत पोर्तुगीज व डच यांना इंग्रजांनी व्यापारी स्पर्धेत मागे टाकले होते. भारतामध्ये व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी इंग्रज व फ्रेंच यांच्यात मात्र अटीतटीची स्पर्धा होती. दक्षिण भारताच्या पूर्व किनार्यावर असलेले चेन्नई हे इंग्रजांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते. त्याच्या नजीक असलेले पुदुच्चेरी हे फ्रेंचांचे केंद्र होते. या सर्व प्रदेशावर कर्नाटकच्या नवाबाची सज्ञ्ल्त्;ाा होती. अठराव्या शतकाच्या मध्यावर कर्नाटकच्या नवाबपदासाठी एतद्देशीय सत्ताधीशांमध्ये तंटा सुरू झाला. कर्नाटकच्या राजकारणात चंचुप्रवेश करण्याची ही सुवर्णसंधी आहे असे फ्रेंचांनी व इंग्रजांनी ओळखले. नबावपद मिळवण्यास उत्सुक असलेल्या एका स्पर्धकाला फ्रेंचांनी तर त्याच्या विरोधकाला इंग्रजांनी लष्करी मदत दिली. या स्पर्धेमुळे सन १७४४ ते १७६३ या दरम्यान इंग्रज व फ्रेंच यांच्यात तीन युद्धे झाली. ही कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात. तिसर्या युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला. सत्तास्पर्धेस फ्रेंच नामोहरम झाल्यामुळे भारतात इंग्रजांना प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही.